“ऑपरेशन सिंदूर”च्या यशानंतर बदलापूरात तिरंगा यात्रा, शूर सैनिकांना मानवंदना
देशभरात ही अनेक ठिकाणी तिरंगा यात्रा, शूर सैनिकांना मानवंदना

बदलापूर : देशभरात भारतीय सैन्य दलाच्या शौर्य आणि बलिदानाला सलाम करण्यासाठी ‘तिरंगा यात्रा’चे आयोजन करण्यात आले असून, नुकत्याच पार पडलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशानंतर ही राष्ट्रीय स्तरावरील जनजागृती मोहीम सुरु झाली आहे. ही मोहीम भारतीय जनता पक्षाने ही अनेक राज्यात सुरु केली असून तिचा उद्देश देशवासीयांमध्ये देशभक्ती, राष्ट्रीय ऐक्य आणि तिरंग्याबद्दल अभिमानाची भावना निर्माण करणे हा आहे.
देशाचा प्रत्येक नागरिक राष्ट्रीय एकता, भारतीय तिन्ही सेनादलाचे मनोबल वाढविण्यासाठी, “हम भारतीय सेना के साथ है” या हेतूने आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या ऑपरेशन सिंदूर या धाडसी निर्णयाला पाठिंबा म्हणून तिरंगा पदयात्रेचे आयोजन बदलापूर येथे करण्यात आले होते. या तिरंगा यात्रेत माजी सैनिक, आमदार किसन कथोरे, प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या संचालिका ब्रह्मकुमारी नंदा दीदी , व सर्व स्वयंसेवक , किरण भोईर – शहराध्यक्ष भाजपा बदलापूर (प.) मा. नगरसेवक, राज्यस्तरीय खेळाडू, ज्येष्ठ नागरिक, महिला, भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारत माता की जय, वंदे मातरम च्या जयघोषात भव्य दिव्य तिरंगा पदयात्रा पार पडली.
मुंबई : मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी सैनिकांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा यात्रेचे उद्घाटन झाले. ते म्हणाले, “पहलगाममधील भ्याड दहशतवादी हल्ल्याला योग्य प्रत्युत्तर देणे आवश्यक होते, आणि ऑपरेशन सिंदूरने अचूकपणे हे प्रत्युत्तर दिले आहे.”
ठाणे: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात देशभक्तीपूर्ण घोषणांनी गगनभरली तिरंगा रॅली काढण्यात आली. या यात्रेत शिवसेना व भाजपचे अनेक नेते आणि नागरिकांनी सहभाग घेतला.